Monday, 12 August 2019

दरवाजा



दरवाजा एक प्रवेशाचे माध्यम घराच्या आत मध्ये जायचं आणि तेच घराच्या बाहेर पाडायचं. दरवाजाच्या अलीकडचे जग आणि पलीकडचे जग किती भिन्न किती वेगळे. आत एकदम सुरक्षित वातावरण तर बाहेरचं जग बरेचसे असुरक्षित. आतली माणसं ओळखीची मायेनं झाकून घेणारी, बाहेर भेटतीलच याचा भरवासा नाही. आत बेफिकीर, निर्धास्त राहिलो तरी फारसा फरक पडणार नाही पण बाहेर थोडीशीही गफलत भारी पडू शकते . म्हणून प्रत्येकाने घराचा उंबरठा ओलांडून जातांना आतल्या लोकांची किंमत काय असते हे समजूनच बाहेर पडावे . रात्री कितीही उशीर झाला तरी गुमान घरी परत यावे कारण उंबरट्याच्या आत मध्ये कोणाचं तरी काळीज तुमच्यासाठी बेचैन झालेलं असतं. ते काळीज मग कधी आईचं असतं, कधी पत्नीचं तर कधी तुमच्या चिमुकल्या चिमणीचं. म्हणून घराचा उंबरठा ओलांडताना लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही बाहेरच्या जगात फारसे कोणी असाल नसाल परंतु आतल्या लोकांचे मात्र तुम्ही "जग" असता.

सुधीर वि. देशमुख
अमरावती
12/08/19

No comments:

Post a Comment

दे रे हरी.....

मागे एकदा मी आमच्या शहरातील आळशी लोकांची बैठक बोलावली होती.  सभेला एकही आळशी आला नाही. सभेला एकही आळशी नसल्यामुळे मलाच स्वतःला सभा घ्यावी ला...