Saturday 26 September 2020

'तोचि पुरुष भाग्यचा' 

गांधीजींच्या यशा मागचं एक महत्वाचं कारण सांगीतल्या जाते ते म्हणजे ते युवकांना रचनात्मक कार्यक्रम द्यायचे. एक कार्यक्रम संपला की त्यांची पुढीची दिशा व त्यासाठी करावयाच्या कृतींचा आराखडा तयार असायचा. त्यांच्या समर्थकांना ते सतत गुंतून ठेवायचे. सोबत स्वतःची व इतरांच्या मनाची मशागत विविध मार्गाने सुरूच असायची . हे झाले सार्वजनिक जीवणाबाबत. वैयक्तिक जीवनात देखील असंच असू शकतं का ? स्वतःच्या आयुष्यात स्वतःसाठी देखील असा दीर्घ पल्ल्याचा किंवा लघु पल्याचा आराखडा तयार असणे आवश्यक आहे का? आपण रोज सकाळी उठतो, सर्वच उठतात, अर्थात आयुष्य एका दिवसाने वाढले असेल तर. सकाळी जाग आल्यावर  एवढया मोठया दिवसाचं आता मी काय करू, हा प्रश्न ज्या व्यक्तीच्या समोर निर्माण होतो तो माझ्या दृष्टीने दुर्दैवी व्यक्ती, तो मग कितीही धनवान असला तरी. मिळालेल्या वेळचं मी काय करू, हा प्रश्न जिथे निर्माण होतो तिथं उदासपणाचा, खिन्नतेचा जन्म होतो. मनुष्य सदा कदा आनंदी राहू शकत नाही हे जरी खरे असले तरी ज्याच्या कडे वैयक्तिक कामाची यादी नाही, तो जीवनाला लवकर कंटाळु शकतो. खूप मोठे धेय्यच असले पाहिजे असं नाही. आपण सर्वांनीच काहीतरी भव्य दिव्य केलं पाहिजे असंही नाही. नवनवीन चांगलं करत राहण्याची, नवनवीन अनुभव घेण्याची हौस माणसाला जगवतं ठेवत असते. कुठलेही श्रम न करता पदरात प्राप्त झालेल्या क्षणाचा उपयोग जो घेऊ शकतो तोच काही तरी  निर्माण करू शकतो. थोडक्यात काय तर मनाची गुंतवणूक आवश्यक आहे.  कुठलंही रचनात्मक/विधायक काम करत असताना वेळ कसा निघून गेला हे ज्याला कळत नाही, त्याचे आयुष्यही असेच हसतखेळत निघून जाते. एखादं चित्र काढतांना, काही तरी चांगलं वाचतांना, बागकाम करतांना, घर स्वच्छ करतांना, चांगलं गाणं ऐकतांना, बाळाचे स्नान करून देतांना, पाळीव प्राण्याची काही सेवा करतांना (यादीत खूप काही मिळवता येईल ) मिळणारा आनंद,  विकार रहित असतो.  छोट्या छोट्या कामाची का असेना पण काहीतरी योग्य कृतींची यादी असणे आवश्यक आहे,  नाही तर आयुष्य ओझं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच वैयक्तिक आयुष्यात, सकाळी उठल्यावर दिवसभर गुंतवून घेण्यासाठी ज्याच्या कडे  कार्यक्रम आहे,  'तोचि पुरुष भाग्यचा'.

©सुधीर वि. देशमुख
अमरावती
२७/०९/२०

'तोचि पुरुष भाग्यचा'


गांधीजींच्या यशा मागचं एक महत्वाचं कारण सांगीतल्या जाते ते म्हणजे ते युवकांना रचनात्मक कार्यक्रम द्यायचे. एक कार्यक्रम संपला की त्यांची पुढीची दिशा व त्यासाठी करावयाच्या कृतींचा आराखडा तयार असायचा. त्यांच्या समर्थकांना ते सतत गुंतून ठेवायचे. सोबत स्वतःची व इतरांच्या मनाची मशागत विविध मार्गाने सुरूच असायची . हे झाले सार्वजनिक जीवणाबाबत. वैयक्तिक जीवनात देखील असंच असू शकतं का ? स्वतःच्या आयुष्यात स्वतःसाठी देखील असा दीर्घ पल्ल्याचा किंवा लघु पल्याचा आराखडा तयार असणे आवश्यक आहे का? आपण रोज सकाळी उठतो, सर्वच उठतात, अर्थात आयुष्य एका दिवसाने वाढले असेल तर. सकाळी जाग आल्यावर  एवढया मोठया दिवसाचं आता मी काय करू, हा प्रश्न ज्या व्यक्तीच्या समोर निर्माण होतो तो माझ्या दृष्टीने दुर्दैवी व्यक्ती, तो मग कितीही धनवान असला तरी. मिळालेल्या वेळचं मी काय करू, हा प्रश्न जिथे निर्माण होतो तिथं उदासपणाचा, खिन्नतेचा जन्म होतो. मनुष्य सदा कदा आनंदी राहू शकत नाही हे जरी खरे असले तरी ज्याच्या कडे वैयक्तिक कामाची यादी नाही, तो जीवनाला लवकर कंटाळु शकतो. खूप मोठे धेय्यच असले पाहिजे असं नाही. नवनवीन चांगलं करत राहण्याची, नवनवीन अनुभव घेण्याची हौस माणसाला जगवतं ठेवत असते. कुठलेही श्रम न करता पदरात प्राप्त झालेल्या क्षणाचा उपयोग जो घेऊ शकतो तोच काही तरी  निर्माण करू शकतो. थोडक्यात काय तर मनाची गुंतवणूक आवश्यक आहे.  कुठलंही रचनात्मक काम करत असताना वेळ कसा निघून गेला हे ज्याला कळत नाही, त्याचे आयुष्यही असेच हसतखेळत निघून जाते. एखादं चित्र काढतांना, काही तरी चांगलं वाचतांना, बागकाम करतांना, घर स्वच्छ करतांना, चांगलं गाणं ऐकतांना, बाळाचे स्नान करून देतांना (यादीत खूप काही मिळवता येईल ) मिळणारा आनंद,  विकार रहित असतो.  छोट्या छोट्या कामाची का असेना पण काहीतरी योग्य कृतींची यादी असणे आवश्यक आहे,  नाही तर आयुष्य ओझं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच वैयक्तिक आयुष्यात, सकाळी उठल्यावर दिवसभर गुंतवून घेण्यासाठी ज्याच्या कडे  कार्यक्रम आहे,  'तोचि पुरुष भाग्यचा'. 

©सुधीर वि. देशमुख

अमरावती

२७/०९/२०

Sunday 20 September 2020

रुपयाचे चणे आणि बरच काही !


शाळेच्या मधल्या सुटीची बेल झाली की एकच आवाज होत होता. सर्व वर्गातील मुलं गोठ्यातील जनावरं बाहेर पडावी तसे ओरडतच बाहेर निघायची. शाळेच्या मैदानात गर्दी जमायची. दोन अडीच तासा पूर्वी शिस्तीत प्रार्थनेसाठी उभ्या असलेल्या मैदानात सर्वबाजूने एकच गोंधळ होत होता. कोणी खेळण्यात गर्क तर कोणी काड्या करण्यात मग्न. (काही लोकांची ही खोड मोठं झाल्यावर जात नाही हा भाग निराळा) मग अचानक लक्ष जायचं ते शाळेच्या प्रांगणात भोवताल उभ्या असलेल्या खाद्य विक्रेत्यांकडे. कोणी टोपलीत पोंगे घेऊन असायचा तर कोणी सायकल वर खारे शेंगदाणे.  बुड्डी का बाल अर्थात शुगर कँडी पण असायची. ही कँडी थेट खाण्यापेक्षा  खेळत खेळत खाण्यात जास्त मजा यायची. आमच्या शाळेत एक म्हातारी चणे घेऊन यायची. साधारण चार आण्यापासून तर एक रुपया पर्यंत चणे मिळायचे. आपलं बजेट पाहून चणे घ्यायचे व सोबत मनमुराद आनंद. चणे घेऊन दुसऱ्या सोबत्यांसमोर खाण्यात भारी गम्मत  वाटायची. कधी कधी वाटणी पण व्ह्यायची. चणे शेयर केले की वर्गात त्याचा नवीन कम्पास वापरायला मिळायचा. कागदावरचे ते चणे तो स्वाद आजही विसरता येणे शक्य नाही. 'Song has the longest life' अशी इंग्रजीत म्हण आहे. मला वाटतं काही स्वादाला देखील असेच लांब जीवन आहे.

आज गम्मत म्हणून  परत चणे तसेच पेपरच्या तुकड्यावर घेऊन बघितलं, अर्थात ती मजा कुठे येणार लगेच ऍसिडिटी इत्यादीची आठवण होते. लहानपणी नसतात असे कोणी शत्रू. 'School was the true vaaccation of my life' असं काहीसं कुठल्या तरी लेखकानं म्हटलं आहे. खरंच आहे पण वर्तमानात शाळा बंद आहेत आणि ही  बंदी आता मुलांना व पालकांना नकोशी झाली आहे.  हे असलं सक्तीचं व्हेकेशन मुलांना नकोय.  सहज आठवलं शाळेच्या मधल्या व नंतरच्या सुट्टीवर आपलं पोट भरणारे विक्रेते काय करत असतील हल्ली ?

सुधीर वि. देशमुख
अमरावती
२०/९/२०२०

बाकी नापासांचे काय ?

त्याचा चौथा व शेवटचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या तीन प्रयत्नात तो मुलाखती पर्यंत देखील पोहचला नाही, पोहचला तर तो शेवटच्या प्रयत्न...